Header Ads Widget

कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचा प्रथम वर्धापन दिन


कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचा प्रथम वर्धापन दिन

विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न

- संदीप शेमणकर

मुंबई -  कुणबी जोडो अभियानांतर्गत कोकणातील प्रत्येक तालुक्याचा दौरा केला असता प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे कुणबी समाजाचा आर्थिक मागासलेपण. हेच मागासले पण दूर व्हावे यासाठी कुणबी समाजाचे तारणहार अशोक वालम यांच्या संकल्पनेतून कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज निर्मिती झाली. या संस्थेच्या माध्यमातून समाजातील नामवंत उद्योजकांना जोडून यांच्या सहकार्याने नवउद्योजक तयार करण्याचे काम सुरू आहे.

शनिवार दिनांक १५ जून २०२४ रोजी दादर येथील मुंबई मराठी ग्रंथालय गावस्कर हॉल येथे या संस्थेचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्या वेळी कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रेमनाथ ठोंबरे यांनी आपल्या प्रेजेनटेशन द्वारा KCCI च्या वर्षभराचा केलेल्या कामाचा आढावा प्रसिद्ध केला. यावेळी समाजातील अनेक उद्योजक, नवउद्योजकांना सन्मानित करण्यात आले. 

समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी समाजातील तरुण पिढी उच्चशिक्षित झाली पाहिजे. हा विचार नजरेसमोर ठेवून संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून दहावी-बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी उद्योजक आणि शैक्षणिक क्षेत्रातील तसेच कुणबी समाजोन्नती संघाचे हंगामी अध्यक्ष सदानंद कास्टे व इतर पदाधिकारी उपस्थित होते, तसेच कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज संस्थापक अशोक वालम,माजी कुलगुरू डाॅ. अरुण सावंत , जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश आप्पा सांबरे,  उद्योजक वसंत उदेग,  हाॅटेल उद्योजक प्रकाश बाईत असे  दिग्गज मान्यवर उपस्थित होते.  या मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाचा फायदा नवतरुणांना निश्चितच होईल, अशी आशा आहे. आलेल्या सर्व मान्यवरांनी या उत्कृष्ट कार्यक्रमाच्या आयोजन व नियोजनाबद्दल कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनसोक्त कौतुक केले.

जाहिरात - अभिज्ञान अकादमी

या कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी जपून वृध्दाश्रम चालविणाऱ्या शर्मिला पडिये , शिक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या संध्या बापेकर यांचा विशेष सत्कार संस्थेमार्फत करण्यात आला. उद्योग क्षेत्रात गरिबीतून व्यवसाय क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे अनुपम म्हसकर आणि संतोष शिगवण, तुषार माने, रवि मते, पाडुरंग शिवगण, उदय बाईत, दीक्षिता पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. या सर्वांनी सामाजिक बांधिलकी म्हणून नेहमीच संस्थेला मोलाचे सहकार्य केलेले आहे.

Post a Comment

0 Comments